सुंदर तारांगण

नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

नेत्र पाहूनी, दिपूनी जाती, ग्रह तार्‍यांचे प्रांगण

शुक्र तेजस्वी नभाची
वाढवे विलासी शोभा
मंगळ गगनी विराजूनी
गाजवे क्रोधाचा गाभा

शनी भोवती कडे सांगे
मी रक्षण करण्यासी थोरं
चंद्र जणू दुग्ध प्राशूनी
भासे पृथ्वीचे लहानगे पोरं

गुरू सतर्क तत्परं आहे
समतोलं राखण्या तत्वांचा
बुध हा लहान असुनी
सांगे मी आहे तिक्ष्ण बुद्धीचा

नक्षत्रे तेजस्वी तारकांची ह्या
सांगती दिशाभानं लोकांना
हर्षलं शेवटी लपूनी
सांगे गुप्तं गोष्टी सर्वांना

धुमकेतूही दौडतं आहे
झाला क्रोधानं व्याकुळं
कधी कधी तरं मध्येचं
असतो उल्कांचा धुमाकुळं

ध्रुवं उत्तरे विराजूनी सांगे
भक्तीचे तत्वज्ञानं
तारे सर्वची नभी मंडपी
जणू सभाचं भरली छानं

हे सर्व पाहूनी, इतुका काही, मी गेलो हो दंगुनं
नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

- प. प्र. आचरेकर

ओझर










“ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ”
सायंकाळची वेळ होती, सर्व घरची मंडळी गप्पाष्टकांमध्ये रंगली होती. चहाच्या भुर्रक्यांचे मनमुराद आस्वाद लुटतं होती. मी देखीलं त्यांतलाच एक भाग झालो होतो. अचानक मनांत एक लहर शिरली! आत्तां आमचे लहरी मन, शांत का राहणार! मग काय! मी माझ्यां सख्यां बंधुस व चुलत बंधुस हाक मारली! इकडेतीकडे गावात भिरभिरणारे दोघेहि क्षणातं हजरं! मी लागलीच त्या अशांत लहरीस वाट मोकळी करुन दिली, मनावरचां ताण कमी झालां खरां, पणं उत्तराचे काय? दोघांचाही होकार हवा होतां, त्याशिवाय काय मन थारणार होतं? मी दोघांच्याही चेहर्‍यावरील हावभाव पाहू लागलो, शेवटी उत्तर काय असणारं! होकारचं! पर्यटनस्थळी भेटं देण्यासं कोण शहाणां नाही म्हणेलं?
लहरीला योग्य प्रतिसाद मिळाल्यावरं मनावरील अखेरचा ताणं निवळला आणि लागलो सर्वजण तय्यारीला. आत्तां लहर कोणती असणारं! एकच असणारं! मालवणनजिक “ओझर” येथील “श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीस्थळी” भेटं देऊन यावी!
जशी सर्वं तय्यारं झाले, मग काय राव! नुसते ओझरं डोळ्यासमोर नाचू लागले. जवळजवळं चार-पाच वर्षांनी भेटं देणार होतो, म्हणून अधिकचं उत्साहं होतां. आम्ही थोरामोठ्यांची परवानगी घेतली आणि लागलो ओझरच्या वाटेला. वाट भली मोठी नव्हती, त्यामुळे पायीच जाण्याचे ठरविले. वाटेत दक्षिण कोकणचा हिरवागारं निसर्ग पाहत, चेष्टां-मस्करी करीत, विविधं छायाचित्रे टिपंत, हसत-खिदळत वाट कापूं लागलो. रेवंडीची घाटी संपली, ओहोळावरील पुल ओलांडले, हडकर दुकान मागे गेले, ओझरचे मळे दिसूं लागले आणि पाहतो तर काय! तो अनमोल क्षणं नजिक आला. मनांत प्रचंड खळबळ निर्माण झाली. मनानं चंचलतेची सीमा पार केली. इतका वेळं थट्टां-मस्करी करीत, निसर्गाचा आनंद लुटणारे, हळूवार संथ गतीनं चालणारे आम्ही अचानक पावलांस वाहनाचे इंजिन बसवावे, तसे चालु लागलो. चाललो कसले, पळतच सुटलो म्हणा नां! पाहतो तरं काय? समोरच ओझरं!
आम्ही ओझरच्या द्वारावरंच होतो. द्वारावरच "श्री ब्रह्मानंद स्वामीं यांची समाधी" असा फलक होता. आंत शिरल्यावर पायर्‍यांसमान उतरन होती. समोरच एक लहानसां धबधबा कोसळत होतां, तो पाहून तर मनं उचंबळुनच उठले. माझे दोन्ही बंधु तर आनंदानं उड्यांच मारु लागले. उजवीकडं वळल्यावर पुन्हा उतरन होती. समोरच एक तलाव होतां. बाजुस थोडे वर चालुन गेल्यावरं एक लहानशी गुहा होती, गुहेच्या मुखावरच “श्री ब्रह्मानंद स्वामीं” यांची समाधी होती. त्या गुहेस लागूनच एक मोठी गुहा होती. सभोवताली वृक्षांची दाटी होती. खोल खिंडीत आम्ही होतो.
धबधब्याचा आवाज, तलावांतील माश्यांची चळवळं, गुहेची आर्त गुप्ततां, आसपासच्या वृक्षांच्या पर्णांचा ध्वनी, दगडांतील झर्‍यांमधून झिरपणारे पाणी, शुद्ध वातावरणं हे सर्व आंम्हास प्रसन्न करीत होते. ओझरच्या गुहेबाबत एक घटना प्रसिद्धं आहे. आसपासच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एकदां स्वामी ब्रह्मानंद त्या गुहेंतून आंत गेले असतां थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरं उमटले. या घटनेवरून पुरातत्वं खात्याने संशोधन देखील केले, परंतू गुहा अर्ध्यावरच बंद झालेली आढळली. हिच असावी त्या गुहेबाबतची गुप्ततां. काही जणांच्या मते हे ठिकाण पांडवकालीन आहे, तर काही जणांच्या मते हे ठिकाण शिवकालीन आहे.
मी त्या गुहेकडं पाहिलं. काही छायाचित्रे काढली. डोंगरांतून झिरपणारं पाणी पाहिलं. थोडे खाली उतरलो. तलावांतील माश्यांची चळवळ पाहिली.पुन्हां थोडं पायर्‍यां चढत वर गेलो. बाजूसच एक देऊळ होते. तेथे दर्शन घेतले व पुन्हां पायर्‍यांकडे वळलो. अर्ध्यावर पुन्हा धबधबा दिसू लागलां. मोह अनावर झालां होतां. खाली उतरुन धबधब्यानजिक गेलो. उंच कड्यावरून उड्या मारीत येणारं शुभ्रं सफेद दुधाळ पाणी मन मोहुन घेत होतं! थोडावेळ एकटक मी त्या धबधब्याकडं पाहत राहिलो. धबधब्याचा मनमुराद आनंद लुटलां. फार उशीर झाला होतां. पुन्हा मालवण येथे जावयाचं होतं. तसेच पुन्हा वर निघालो. शिवरायांच्या मावळ्यांची आठवण झाली. पुन्हा तोच फलक परंतु विरुद्ध दिशां, जाताना जीव वर खाली होत होता. परंतू मोहाला देखील मर्यादा आहेत. मी पुन्हा त्या फलकाकडे पाहिले. मी का पाहिले असेल? हे कोणताही पर्यटनवेडा व्यक्ति जाणेलचं!
ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ आहे. गुहां, देऊळ, समाधी, तलावं व धबधबा असे सर्वचं एका ठिकाणी सापडल्यासं किती आनंद होतो, हे केवळं भेट देण्यार्‍यासंच कळेलं! म्हणुनच या स्थळास आयुष्या एकदातरी भेट द्यावीच!

स्थळ : ओझर-"श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी" “आचरे रोडवर”
जवळचे रेल्वे स्थानक : कुडाळ
जवळचे बस स्थानक : मालवण
जवळचे शहर: मालवण
पाहण्यासारखे: समाधीस्थळं, तलाव, गुहां, धबधबा

परेश प्र. आचरेकर
acharekar_pareshh@rediffmail.com

मी परेश आचरेकर……,

आयूष्यातं खूप काही करावं, त्यासाठी वाटेल तेवढं धडपडाव,हा एकचं ध्यासं घेवून जगतानां, त्यात
कितीही अडचणी आल्या तरी मागे परतायचं नाही, हे मनोमन पक्कं केलं आवडं नसताना देखीलं एम. सी. सी. कॉलेजमध्ये वाणिज्यं शाखेत प्रवेश घेतलां.सुरूवातीला इंग्रजीचा थोडासा त्रासं झालां, परंतू कष्टाने, कशीबशी अकरावी झाल्यावरं मात्र बारावीला अभ्यासावरं जोर दिला. कमलाकर क्लासेसच्यां, कमलाकर सरांनी स्फुर्ती दिली व त्यां स्फुर्तीनेचं बारावीचे युद्धं त्र्याहत्तरटक्क्यांवर जिंकले.वाणिज्यं शाखेतचं पदवी घेतल्यावरं, पुढे काय करावयाचं, या प्रश्नातं गूंतलेलो असतानां, स्पर्धा परीक्षांचे फॅड मनातं व मलां योग्यं दिशां मिळाली. इतिहास, राज्यशास्त्रं, अर्थशास्त्र, मराठी वाङमय, प्रशासन या आवडत्या विषयांचा परीसस्पर्श झालां.त्याचवेळी कायदां या माझ्या आवडत्यां विषयातं पदार्पण झालं. ठाण्यातीलं व्ही. पी. एम. टि.एम. सी. कॉलेजमध्ये प्रवेशं घेतलां व दोहोंचा अभ्यास करु लागलो. सुरूवातीलां मराठी भाषा की इंग्रजी भाषा याबद्दल संभ्रम होता, परंतू कायदे ब्रिटिशबेस आहेत हे कळल्यावरं इंग्रजी भाषा स्विकारली.

ऐरोलीत स्थायिकं झाल्यावरं, नव्यां ओळखी झाल्यां, नवे मित्रं मिळाले. मला माझ्यां आवडीची,मला हवी होती, तशीचं‘साई पॅराडाइज सोसायटी’ लाभली. चांगली संगत मिळाली, आमच्या सोसायटीत “श्री साई बाबांचे” मंदिर आहे, तेथे भजन करावयास सोसायटीतील मंडळी बसू लागली व तबला वाजवण्याची
आयती संधी लाभली।


आमच्या सोसायटीत सर्व उत्सवं साजरे होऊ लागले, गणपती, स्वातंत्र्यदिन, होळी, रंगपंचमी, तुळशीविवाह, थर्टीफर्स्ट असे सर्वचं. या सर्वांमूळे मला स्फुर्ती मिळाली.

ऐरोलीतचं ‘महाराष्ट्रं सेवा संघा’ची लायब्ररी लाभली, विविध कादंबर्या व पुस्तके वाचली, अजून बहुसंख्य वाचावयाची आहेत.मध्ये ‘पॅनकार्ड क्लब’ची एजन्सी देखीलं घेतली, केवळं एका मित्राच्या आग्रहाखातीरं.

राजकारणाची आवडं होतीच व तशी एका चांगल्या पदाची संधी देखीलं चालून आली, परंतू शिक्षणामूळे व नवी मुंबइच्या एकंदर राजकिय परीस्थितीचां विचार करता ‘दुरून डोंगर साजरे’हाच विचारं मनात आला व
‘पुढे पाहू’ असे राजकिय उत्तरं देवून, काढता पाय घेतला.

आयुष्याची असंख्य स्वप्ने पाहताना ती पूर्ण व्हावीत म्हणून अजून खुप काही करावयाचे आहे आणि ते “ध्येय्यं” गाठण्यासाठी पुष्कळं धडपडावे, हाच “आशावाद” आहे. हेच आहे, थोडक्यातं "माझ्याबद्दलं", माझ्या आयूष्याच्या प्रवासाबद्दल ...

वाचाल तर वाचाल!

The world is waiting for “PEACE”, but how far we get this; it’s actually the mystification in the mind of all. There are such mentalities moving ubiquitously which are out of the sympathetic. This sort of mentalities for all time killing to the thousands of Peoples and enjoy this type of monstrous credence.

How we will be capable of having power over such kinds of mentalities? we are still meandering, However the obliteration of the globes is going on and we are still inspecting and thinking about there behavior.

Napoleon has said “Nothing is ‘Impossible’ in my own Dictionary”
Apart from above deep sentence, we only calculate the Napoleon’s Mightiness and his cruelness. What’s about his Confidence?

Today whatever confidence these types of tendencies are having,whether that type of confidence, we have........? Think deeply on it? Its Important…

Another Important question….arising at all time in my mind that is----->

"Not only those all but we are also the part of such mentalities, isn’t it true? We own are corrupted and looking besides the whole world and blaming those all monstrous credence who is keeling the human values"
….think yourself….think twice…..because….I m also……thinking on It… when…yes when…. we will implement on it….






माझं गावं,
निळाशार समुद्रकिनारी वसलेलं माझं गावं. मालवण येथून सुमारे तीन किलोमीटरचं अंतर. आमचं घर अगदि किनार्याला भिङलेलं त्यामूळं लाटांच्या गर्जणार्या आवाजानं शांतता दुरापास्तचं. आमचं गावचं घरं म्हणजे नव्यां जून्याचां संगम.लहान ङोंगरातून लहानशी लालबुंद वाट जाते, त्या वाटेच्यां आजूबाजूला हिरवीगार झाङं आहेत. वाट उतरतानां जवळचं एक भलं मोठं वटंवृक्षं आहे, त्या वृक्षावरं नेहमीचं मर्कटांची गर्दी असते. पुढं सरळं चालंत गेल्यावरं एक विहिंर आहे. विहिरीलां लागुनचं एक ओहोळं आहे, आणि ओहोळं ओलांडल्यावर समोरचं भलं मोठं घरं दिसेलं, ते आहे आमचं घर. आमचं अंगण मोठं आहे. घरासमोरं तुळशीवृंदावन आहे. आमच्या परङ्यात तुंम्हाला विविध वृक्ष आढळतील, आम्र, काजू, कल्पवृक्ष, जाम, जांभुळ, रतांबा, करवंद, तोरणं, बदाम असे एक नाही तर असंख्य वृक्ष. त्यातंल्यात्यातं मागील बाजूसं असलेलं मोठालं काजूचं झाङ आमचं आवङतं. त्यावरं मनसोक्तं खेळायचं, झोकायचं हे आमचे छंद. खाली गेल्यावरं सागराचं दर्शन. आमचं आवडतं ठिकाण. पाण्यात तासनतास खेळायचं, वाळूत लोळायचं ह्याचाच आनंद. मुंबईतील धकाधकिच्या जिवनातूनं गावी जाणं आणि गेल्यावरं तिथंच रहावेसं वाटनं सहाजिकचं. कारणं आमचं गाव आमच्यासाठी स्वर्गचं. खरोखरंचं दक्षिण कोकणातीलं परशूराम भुमीतीलं आमचं गावं म्हणजे आम्हाला ईश्वरानंदिलेलं वरदानचं.........

आहे असाचं मी,

आहे जसां मी,

माझ्यां प्रतिभेच्यां ज्वालां जरं पेटूनी का उठल्यां,
करेलं क्षणी काही अजबं हां ईश्वरी खेळं सारां,
मर्म जाणिले जयाने जन्माचे भव्यं सारं,
कर्तव्यें करण्यां सदैवं दंग जीव माझा।


वाटेवरी जरी कुणीही पत्थरं का भरले,
क्षणातं भस्मं होतीलं ते एका तीव्रं इच्छेने!
महत्वाकांक्षां आहे का माझी इतकी क्षुल्लकं?
कि देइनं तयांना आसरां जे मज पाडण्या चतुरं!

रक्षिण्यासं मज सतत हे दैवी तेजं असतां,
कुणा होईलं बुद्धि माझां घातं करण्याची,
जो जो करिलं असे धाडसं प्रक्षुब्ध क्रौर्याचे,
क्षणातं होइल फिके तयाचे आत्मतेजं पहां!

विराटं वादळें जरी कां उठली योग्यं कर्म कार्यात,
एकाएकी फूंकूनी उधळवीणं पवनाची गर्वसत्तां!
संघर्ष करितं राहिन आयूष्यें अंत जरी का आलां,
यमदूतासं परतवीणं सांगेनं कार्य संपले न आत्तां!
- प प्र आचरेकर